निवडणूक कालावधीत पोलिसांची कसोटी
मुंबई निवडणुकीचा कालावधी म्हणजे पोलिसांची खरी कसोटी असते. निवडणूका जाहीर झाल्यापासून मतदान आणि निकालपर्यंतची प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी मुंबई पोलिसांनी नाकेबंदी ते नेटबंदी अशी मोहीम हाती घेतली आहे. हाणामाऱ्या, आपसांतील वाद रोखण्यासाठी उमेदवारांच्या प्रचार फेऱ्या आणि चौक सभांना बंदोबस्त पुरविण्यात येत आहे. रोकड, दारू. ड्रग्ज तसेच इतर वस्तूची चोरटी वाहतूक रोखण्यासाठी ठिकठिकाणी नाकेबंदी लावण्यात आली आहे तर दुसरीकडे इंटरनेटवरील आचारसंहितेकडेही विशेष लक्ष दिले जात असून अनेक आक्षेपार्ह पोस्ट काढून टाकण्यात आल्याची माहिती सायबर पोलिसांनी दिली आहे.
निवडणूक जाहीर होताच ती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंतच्या कालावधीत पोलिसांना फारच दक्ष राहावे लागते.